मुंबईI बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला विजेता अभिनव बिंद्राच्या यांच्यावर आधारित बायोपिक आता लवकरच येणार आहे. या बायोपिकची घोषणा होऊन पाच वर्षांचा काळ लोटला आहे.तर चित्रपट अनेक कारणांमुळे रखडला आहे अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र, ही चर्चा खुद्द हर्षवर्धन कपूरनेच थांबवली आहे. हर्षवर्धन कपूर हाच अभिनेता बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रा यांची भूमिका साकारणार आहे.
यावेळी हर्षवर्धन कपूर म्हणाला की, ‘मला वाटते की तुम्ही माझ्या वडिलांना चित्रपटाबद्दल विचारले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेच उत्तम व्यक्ती आहे. कारण, तेच या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. आम्ही निश्चितपणे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचे चित्रीकरण करू”चित्रपटासाठी खूप तयारीची आवश्यक आहे. प्रामाणिकपणे सांगितले तर थारच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्याच्या आधीही हा चित्रपट व्हायला हवा होता. आम्ही पुढे गेलो आणि मध्ये दोन चित्रपट बनवले. परंतु, अभिनव बिंद्रा यांची बायोपिक सुरू करू शकलो नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे’ असेही हर्षवर्धन कपूर याने सांगितले आहे.
‘हे मोठ्या पडद्यावर एखाद्या वास्तविक जीवनातील व्यक्तीची भूमिका करण्यासारखे आहे. आयुष्यात खरा खेळाडू होण्यासाठी १५ ते २० वर्षांच्या कालावधी लागतो. या पेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो. या भूमिकेसाठी खूप मेहनत घेणार आहे. थार सारख्या प्रोजेक्टसाठी आम्ही राजस्थानला जाऊन दोन महिने शूटिंग केले आणि ते एकाच वेळी पूर्ण केले. त्याचप्रमाणे आम्ही मुंबईत २० दिवसांत शूटिंग केले. परंतु, हा चित्रपट खूप मोठा आहे, असेही हर्षवर्धन कपूर याने नमूद केले आहे.