मुंबई | काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेता शशांक केतकर यानं देखील एक व्हिडिओ पोस्ट करत तो राहत असलेल्या परिसरातील रस्त्यांची अवस्था दाखवली आहे.
शशांकनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ त्यानं मालाड परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था दाखण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण बाजूला ठेवून साध्या साध्या गोष्टींकडं राजकारण्यांनी ज्यांना जनतेनं निवडून दिलं आहे, त्यांनी लक्ष द्यायला हवं, असं शशांक म्हणतोय. रहदारीच्या ,महत्त्वांच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यानं विचारला आहे. अशा रस्त्यांवरून गाडी चालवणाऱ्याच्या महागड्या गाड्या खराब होत आहेत, नागरिंकाना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय, असं शशांकनं म्हटलं.
शशांकनं एक पोस्टही शेअर केली आहे. महत्त्वाचे पाच मुद्दे त्यानं या पोस्टमध्ये मांडले आहेत.
मुद्दा क्र. १– तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या.
मुद्दा क्र. २ – हा व्हिडिओ मुळात कोणाच्या तरी सपोर्टसाठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या रस्त्यांबद्दल माझं म्हणण आहे.
मुद्दा क्र 3 – रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हातार्या आई बाबांना डॉक्टर कडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!
मुद्दा क्र 4– उत्तम सोयी आणि उत्तम रस्ते मिळाल्यावर ते नीट वापरण्याची जबाबदारी आपली नागरिकांची सुद्धा आहे.
मुद्दा क्र 5– चला एक movement सुरू करु. हा चलता है attitude संपला पाहिजे! तुम्हाला असे रस्ते दिसले तर त्याचा Video post करा. मला आणि योग्य त्या authorities ना त्यात tag करा आणि हे करताना #YeNahiChalega हा hashtag वापरा.