मुंबई | राज्यामध्ये सरकारी कर्मचारी यांची गुणवत्ता आणि खर्चसुधार धोरणेनुसार आठवड्यामध्ये केवळ पाच दिवस सरकारी कामं सुरु होती. परंतु आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी कर्मचार्यांना सोमवार ते शुक्रवार असे कामाचे दिवस होते पण, यापुढे शनिवारपर्यंत कामाचे दिवस वाढवण्यात येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यामुळे पूर्वीच्या धर्तीवरच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मंत्रालयासह सर्व प्रशासकीय कार्यालये सुरू राहणार असून, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयांना सुटी राहतील अशी माहिती समोर आली आहे.
जर शनिवारी देखील कार्यालयीन कामे सुरु राहिली तर, दररोजप्रमाणे सरकारी कर्मचार्यांना कामावर रुजू राहायला लागेल अशी शक्यता आहे.