मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 619 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात शनिवारी 619 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 686 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,66,768 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.13 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 3,709 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 752 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 457 सक्रिय रुग्ण आहेत.