कोल्हापूर | देशभरात ‘लव जिहाद’शी संबंधित प्रकरणं चालू असताना आता महाराष्ट्रामधून एक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलिस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेला तब्बल १८ दिवस झाले असून ती शाळकरी मुलगी अजून बेपत्ता आहे. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजावाडा पोलिसांना जाब विचारला आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. या प्रकरणातील मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. प्रकरण नाजूक असल्यामुळं पोलिस काळजीपूर्वक तपास करत आहेत.
दरम्यान, आता नितेश राणेंच्या नेतृवात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणाचा शासनाने गांभीर्याने तपास करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.