यंदाचं वर्ष हे निवडणूकांचं वर्ष आहे. मुळात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या सत्राचं हे शेवटचं वर्ष आहे.नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारनं गेल्या 10 वर्षात अनेक नव्या योजना काढल्या.विशेष म्हणजे या योजनांच्या आधारावर देशातील उद्योग क्षेत्रालाही बळ मिळाल्याचं आणि देशाची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचा दावा सातत्यानं भाजपकडून केला जातो.या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि आगामी निवडणूकांचा विचार करता यंदाचा अर्थसंकल्प नरेंद्र मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पात कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत..
ADVERTISEMENT
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक योजनांचा उल्लेख केला.यावेळी पी एम किसान योजनेचा 11 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सितारामण यांनी सांगितलं..शिवाय किसान संपदा योजनेतून 48 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून शेती क्षेत्रातून तीन लाख कोटींचा व्यापार झालाय आणि यामध्ये किसान रोजगारासाठी दहा लाख नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं सितारमण यांनी सांगितलं..जीएसटी प्रणालीमुळे एक देश एक बाजार संकल्पना यशस्वी झाली असून सीफूड दुपटीनं निर्यात वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं.सोबतंच दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.विशेष म्हणजे अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सितारमण यांनी गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करतंय असं म्हणत 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.