मुंबई | महाराष्ट्रातील मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठं विधान केले आहे. ‘चंद्रकांत पाटील आणि मी या विषयावर चर्चा करणार आहोत. लवकरच बेळगावमध्ये जाण्याचा दिवस निश्चित करू, असे विधान त्यांनी केले आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नावरून तेढ निर्माण झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, अशा सक्त सूचना केल्या होत्या. त्यानंतर राजकीय स्तरावर मोठी चर्चा सुरु होती. त्यानंतर अखेर हा बेळगाव दौरा रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याच दौऱ्याविषयी शंभूराज देसाई यांनी विधान केले आहे. चंद्रकांत पाटील आणि मी या विषयावर चर्चा करू आणि लवकरच बेळगावमध्ये जाण्याचा दिवस निश्चित करू, असे ते म्हणाले.
संजय राऊतांचाही समाचार
महाराष्ट्रातील मंत्री बेळगावला जाण्यास धजावत नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर मी संजय राऊत यांना आव्हान देतो. बॉर्डरला तरी शिवून यावं. आम्ही तर केव्हाही जाऊ. पण तुम्हाला बेळगाव न्यायालयाने 8 दिवसांपूर्वी बेळगावला बोलावले आहे. मग तुम्ही का गेला नाहीत?, असा सवाल केला.