मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे २९ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण सुरु केले त्या दिवसापासून ते आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण लढ्यात अनेक चढ उतार आपण पाहात आलोय… सध्याच्या परिस्थितीत जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा महाराष्ट्र सरकार मोडून काढण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे
ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी आंदोलने झाली. याप्रकरणी बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मराठवाड्यात तब्बल १४६६ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई खुपच मोठी असल्याचे बोलले जात आहे.
अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.त्यातच जरांगे यांनी फडणवीसांना आव्हान देत अचानक मुंबईची वाट धरल्याने एकच गोंधळ उडाला होता.मात्र, त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मराठा समाजाने विनंती केल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता सरकारने जरांगे यांच्यावर कारवाईचे अस्त्र उचलले आहे.दरम्यान, मराठा समाजाने ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनाची दखल घेत अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यात तब्बल १०४१ जणांवरतर बीड जिल्ह्यातील ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.