नंदुरबार | छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची सभा झाली. यावेळी उमेदवारी अर्जावरून झालेले राजकारण आमच्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठीच झाले असा आरोप करत यावर वेळ आल्यावर बोलणार असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कॉंग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली असता काही कारणाने निर्णय झाला नाही. तसा उमेदवारी अर्जदेखील सादर केला होता मात्र, एबी फॉर्म आपल्यापर्यंत पोहचलाच नाही म्हणून अपक्ष उमेदवारी झाली असे तांबे यांनी सांगितले.
गेल्या २० वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून काम केले आहे. आता मोठ्या व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची संधी मिळावी म्हणून उमेदवारी केली असेदेखील तांबे म्हटले आहे. त्याचबरोबर मतदारांच्या प्रश्नांवर तोडगा काढणार, त्यामध्ये सध्या शाळा माजी विद्यार्थी आणि लोकसहभागावर सुरू आहेत आगामी काळात यासाठी व्यापक काम करणार त्याच अनुषंगाने एप्रिल महिन्यात शिक्षक परिषद घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजकीय इच्छाशक्ती असेल तर, जुन्या निवृत्तीवेतनाचा मुद्दा सुटेल, अन्यथा हा मुद्दा आगामी काळात देशाच्या निवडणुकीचा मुद्दा होईल. शिक्षणावर सात टक्के खर्च करायला हवा, मात्र आपण अडीच टक्केच खर्च करत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.