मुंबई | बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खानचा पठाण सिनेमा वादात सापडला आहे. या सिनेमावरून शाहरूख खानवर टीका केली जात आहे. असे असताना त्याने यावर विचार व्यक्त केले. ”निगेटिव्हिटी सोशल मीडियाचा वापर वाढवते. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बहकवण्याचे आणि विभागण्याचे काम करतात. जगाला वाटेल ते करू दे पण मी आणि तुम्ही जितके पॉजिटिव्ह लोक आहोत. ते सर्व जिवंत आहोत”, असे शाहरूख म्हणाला.
शाहरूख खानच्या पठाण सिनेमातील पहिले गाणं बेशर्म रंग रिलिज झाले. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. पठाण सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर केली गेली. तरीही त्याच्या चाहत्यांनी बेशर्म रंग हिट केले खरे पण काही संघटनांनी दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकीनीवरून विरोध केला. इतकेच नाही तर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तर मिश्रा यांनीही शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या गाण्यावर आक्षेप घेतला.
यावर शाहरूख खान म्हणाला की, ”सिनेमा माणसाची वागणूक दाखवतो. त्यातून बंधुभाव आणि सहानुभूती येते. वातावरण बिघडणार आहे. काही महिन्यांपासून तुमच्याशी भेट होऊ शकली नाही. पण आता जग पूर्वपदावर येत आहे. आम्ही सर्व खुश आहोत. मी सर्वात जास्त खुश आहे. जगाला वाटेल ते करू दे. पण मी आणि तुम्ही जितके पॉजिटिव्ह लोक आहोत. ते सर्व जिवंत आहोत”.