नवी दिल्ली | रेशन कार्डधारकांना विविध योजनांच्या माध्यमातून सरकारकडून दिलासा दिला जातो. या योजनांचा फायदाही मोठा असतो. त्यात आता सरकारने अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी आणखी एक योजना आणली आहे. त्यानुसार, 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.
केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. यापैकी अंत्योदय योजना ही त्याचाच एक भाग आहे. अंत्योदय अन्न योजनेमध्ये राज्यांमधील टीपीडीएस अंतर्गत समाविष्ट असलेल्या बीपीएल कुटुंबांपैकी एक कोटी गरीब कुटुंबांची ओळख पटवून त्यांना गहू 2 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळणार आहे. तसेच तेल आणि मीठही मोफत मिळणार आहे.