पुणे | महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा खातेवाटप कार्यक्रमाला आज मुहूर्त लागला. कोणाच्या पदरी निराशा पडली, तर कोणाच्या घरी लक्ष्मी आली. या खातेवाटपावरुन गेली अनेक दिवस रात्रीच्या बैठकी सुरु होत्या. यानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील एकूण खातेवाटपावर एक नजर टाकल्यास कळते की राज्यातील राजकारणात नेमकं काय सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती आणि काय मिळाले. तसेच सध्या आमदारांमध्ये हा विषय चांगलाच रंगला आहे की कोणाला खुर्ची भावली आणि कोणाला मिर्ची झोंबली.
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा पाटील – उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ,
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या खातेवाटपात काही महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे, आणि त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास हे खात देण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यावर आमदारकीच्या अपात्रतेची टांगती तलवार असतांनाही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. दुसरीकडे अतुल सावे यांच्याकडे असलेलं खातं काढून त्यांच्याकडे दुसऱ्या म्हणजेच गृहनिर्माण खात्याची जबाबदारी दिली आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला एकूण तीन खाती गेली आहेत. तसेच भाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत. एक घास चिऊचा आणि एक घास माऊचा हा कार्यक्रम झाला आहे, आता पुढे काय होईल हे पाहणं गमतीशीर असणार आहे. कोण फुगेल आणि कोणाचा रुसवा निघेल याच उत्तर लवकरच आपल्याला मिळेल.