कधीकाळी अकल्पनीय वाटणा-या आघाड्या झाल्या, पक्ष फुटले, कुटुंब दुंभगली, निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी सहज निष्ठा बदलल्या, प्रदीर्घ न्यायालयीन लढाया झाल्या, पण न्याय झाला का याबद्दल शंका कायम राहिली आणि त्यात मतदारांचीही फाटफूट झाली.मतदारांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम दिसतो आहे.कारण तशी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी, जास्त जागा जिंकण्यासाठी या निवडणुकीत खऱ्या अर्थाने कस लावावा लागतोय.निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेत.आणि आता उरलेत दोन टप्पे.या शेवटच्या दोन टप्प्यांत शिवसेनेचा कसा कस लागतोय ? याचविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
देशात भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे.पण महाराष्ट्रात महायुती अडखळताना दिसत असल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे…कारण महायुतीला महाविकास आघाडी तोडीसतोड उत्तर देताना दिसतेय.महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.पहिल्या तीन टप्प्यात सहा मतदासंघांत शिवसेना निवडणुकीला सामोरे गेली असली तरी उर्वरित दोन टप्प्यांमध्ये आपल्या नऊ उमेदवारांच्या भवितव्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे.पहिल्या तीन टप्प्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहा उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद झालं आहे.आणि आता उर्वरित नऊ उमेदवारांचं भवितव्य चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ठरणार आहे.
पहिल्या टप्प्यात रामटेक, दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम, हिंगोली, बुलढाणा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले या जागा शिंदेसेनेने लढवल्या आहेत. तर येणाऱ्या चौथ्या व पाचव्या टप्प्यामधील छत्रपती संभाजीनगर, मावळ, शिर्डी, मुंबईमधील तीन जागा, ठाणे, कल्याण, नाशिक या नऊ जागा शिंदे यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत.
आता कस कसा लागणार हे समजून घेऊ.पहिला मुद्दा म्हणजे तोडफोडीच्या राजकारणामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे..दुसरा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती असल्याने शिंदेसेनेसमोर तगडं आव्हान आहे.तिसरा मुद्दा भाजपसाठी सत्ता महत्वाची असल्याने शिंदेंच्या जागा कमी होणं परवडणारं नाही.चौथा मुद्दा एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे आर्थिक राजधानी मुंबईवर पकड कोणाची हे स्पष्ट होईल.पाचवा मुद्दा या निवडणुकीत शिंदे यांचा मतदार स्पष्ट होईल.आणि सहावा मुद्दा राज्याच्या राजकारणातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचंही महत्व ठरेल.