राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५. ८१ टक्के इतका लागला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात वाढ झाली असली तरी या निकालामधून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे..मातृभाषा असलेल्या मराठी विषयात तब्बल ३८ हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही सहापटीने जास्त आहे.आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना देखील हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयातच गंटागळ्या का खाल्ल्या? पाहुयात याबातचा हा स्पेशल रिपोर्ट.
विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने १० वी चं वर्ष खूप महत्त्वाच मानलं जातं.त्यामुळे शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून दहावीच्या परीक्षेसाठी कसून तयारी केली जाते. सध्या बदलती शैक्षणिक पद्धती व इंग्रजीचा वाढत प्रभाव पाहता ‘आपुल्याच घरात हाल सोसते’ मराठी अशी परिस्थती निर्माण झाली आहे.कारण इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे.राज्यात एकूण १० लाख ९४ हजार १५२ विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी १० लाख ५५ हजार ७१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच ३८ हजार ४३७ विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत. इंग्रजी विषयाचा निकाल ९८. १२ टक्के इतका लागला.३ लाख ५९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला..त्यापैकी ३ लाख ५२ हजार ४९१ जण उत्तीर्ण झाले. इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या ६ हजार ७३८ इतकी आहे. मराठीमध्ये नापास होणाऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. त्यामुळे मराठी भाषिक राज्यात मुलांना मराठीच अवघड जात असल्याची बाब समोर आली आहे.इंग्रजी भाषेच्या शाळांच्या प्रभुत्वामुळे मराठी भाषेच्या बाबतीत न्यूनगंड निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं.त्यामुळे अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत..हे टाळायचं असेल तर मराठी प्रेमी जनेतने, साहित्य परिषेदेच्या संस्थांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केलं पाहिजे तरच ही परिस्थिती सुधारता येईल.अन्यथा मराठी भाषेच्या विकासाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे हे यातून लक्षात येतं.