राजकारणातील महिलांच्या कर्तृत्वाचा इतिहास वेळोवेळी साक्षीदार आहे. जगभरातील सामर्थ्यवान राजकीय महिलांनी गरज पडेल तेव्हा अनेकदा राजकीय राजदंड आपल्या हातात घट्ट धरला आहे. भारताने वेळोवेळी अशा प्रभावशाली महिला राजकीय व्यक्ती पाहिल्या आहेत. त्यांच्या योजना आणि राजकीय वैशिष्ट्यांचं अनेकांनी कौतुक केलं आहे. देशाच्या विकासातील त्यांचं योगदान कधीही नजरेआड करता येणार नाही. भारतात अनेक महिलांनी आपल्या कतृत्वाने वेळोवेळी राजकीय आयाम बदलले आहेत. यात स्व. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदी असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला धुळ चारली होती. तर प्रतिभाताई पाटील या देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. वर्तमानामध्येही निर्मला सीतारामण देशाचं अर्थमंत्री पद सांभाळतायत.स्मृती इराणी केंद्रीय मंत्री आहेत.ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत.अशा अनेक महिलांच्या कर्तृत्वाची झेप भारतीयांनी पाहिली आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजकारणातल्या भारतीय रणरागिणींविषयी थोडक्यात जाणून घेऊयात…