मुंबई | समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील 520 किमीच्या मार्गाचे लोकार्पण रविवारी होणार आहे. या महामार्गाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे या महामार्गाला नाव कसं दिलं गेलं याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नागपूर ते मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किमी टप्प्याचे लोकार्पण होत आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येईल. पण या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव कसं काय दिलं गेलं याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, ”मी मंत्री असताना आम्ही या महामार्गाचे काम सुरू केले होते. आज मी मुख्यमंत्री असताना त्याचे लोकार्पण होत आहे. हा योगायोग आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव आम्ही देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे”.
तसेच बाळासाहेब हे मोठं उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या संकल्पनेतून पुणे-मुंबई महामार्ग तयार झाला होता. नितीन गडकरी तेव्हा एमएसआरडीसीचे मंत्री होते. त्यामुळे हा तर 700 किमीच्या समृद्धी महामार्ग आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव देऊ अशी संकल्पना आम्ही मांडली होती. त्यावेळी सगळ्या गोष्टी त्यावेळी जुळून आल्या आणि आम्ही समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले, असे ते म्हणाले.